प्रारंभिक कादंबरीचं सखोल चिंतन
मराठी कादंबरी एकोणिसाव्या शतकात निर्माण झाली. तेव्हा सबंध हिंदुस्थान परतंत्र, परभृत होता; अर्थात परपुष्टीही चालू होती. परंतु, पारतंत्र्याच्या पहिल्या अर्धशतकातच स्वातंत्र्याच्या उठावाला सुरुवात झाली. ब्रिटिशांनी आपली पाळंमुळं घट्ट रोवण्यासाठी काही सामाजिक सुधारणा केल्याही, तसंच जागृतीसुद्धा त्याच पोटी होऊ लागली. वाईट चालीरीती-सतीप्रथा, बालजरठ विवाहास विरोध, मुलींच्या विवाहाचं आक्रमण, शुद्धीकरण, सामाजिक प्.......